‘जलयज्ञ’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

लातूरमधील जलपुनर्भरण प्रकल्पावर आधारित पुस्तक

मुंबई, 22 मार्च 2017/AV News Bureau:

जानाई प्रतिष्ठानच्या वतीने  लातूर जिल्ह्यात राबविलेल्या विंधन विहीरींचे जल पुनर्भरण प्रकल्पावर आधारित अभियंता अतुल ठोंबरे यांनी लिहिलेल्या ‘जलयज्ञ’ पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विधानभवनात करण्यात आले.

यावेळी श्री ठोंबरे, सहदेव विजय, देवदास कुलकर्णी, दीलीप कुलकर्णी, प्रफुल्ल देशपांडे, नागेश खेडकर, विष्णू जेऊरकर, चारुदत्त भुजंग गुरुनाथ मगे आदी उपस्थित होते.

जानाई प्रतिष्ठानने गेल्या वर्षी लातूर जिल्ह्यात 1 हजार विंधन विहिरी (बोअरवेल ) च्या जलपुनर्भरणाचा कार्यक्रम आखला होता. या उपक्रमाची संपूर्ण माहिती या पुस्तकात दिली आहे.