शिवजयंतीनिमित्त रणजित नाईक यांच्यातर्फे रुग्णांना फळवाटप

अविरत वाटचाल न्यज नेटवर्क

नवी मुंबई, १९ फेब्रुवारी २०१९

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई भाजपचे युवानेते रणजित नाईक आणि दारावे येथील जय शिवराय मित्र मंडळाच्यावतीने नेरुळ येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

शिवजयंतीचे बॅनर लावण्याऐवजी तोच खर्च चांगल्या कामासाठी आणि लोकाभिमुख उपक्रमासाठी वापरावा, अशी आपली इच्छा होती. त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांनीदेखील ही कल्पना उचलून धरली. त्यानंतर दारावे परिसरातील जय शिवराय मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत परिसरातील महापालिका रुग्णालयांमध्ये फळ वाटप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रणजित नाईक यांनी दिली.

  • आज दुपारी मीनाताई ठाकरे रुग्णालय तसेच नेरुळ रेल्वे मार्गालगतच्या झोपडपट्टीतील मुलांना आणि नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले. सीवुड पश्चिम येथील रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र तांडेल, मयुर नाईक, किरण नाईक, विकी भोईर आणि जयशिवराय मित्र मंडळाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

===========================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा