निष्ठेने काम करूनही शेकापत न्याय मिळाला नाही 

ग्रामपंचायत सदस्य संतोष माळी यांची खंत

पनवेल, 8 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

निष्ठेने काम करूनसुध्दा शेकापक्षात न्याय मिळाला नाही, आमच्यावर कायम अन्यायच झाला म्हणून मनमानी कारभाराला कंटाळून पक्षाचा त्याग करीत असल्याचे सावळे ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष बाळाराम माळी यांनी सांगितले.

ग्रामपंचायत सदस्य संतोष माळी यांनी समर्थकांसह आज शेकापतून भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला.  पनवेल तालुका व शहर भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी  भाजपाचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, गुळसुंदे जिल्हा परिषदेचे उमेदवार व राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, गुळसंदे पंचायत समिती सदस्य डॉ. अविनाश गाताडे, विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी माळी, संजय टेंबे,  नाना म्हस्कर आदी उपस्थित होते.