पारदर्शक कारभारालाच मत द्या

cm at ulwe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पनवेल, 15 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी  थेट जिल्हापरिषदांना देते. त्यामुळे या जिल्हा परिषदांच्या चाव्या पारदर्शी कारभार करणाऱ्यांच्या हातात द्या, असे सांगत पारदर्शक कारभार हेच आपल्या सरकारचे ध्येय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उलवे येथे केले.

रायगड जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भाजप,रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

मुंबई विमानतळाची क्षमता संपली असून नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कार्गो टर्मिनल्स,जेएनपीटी,एअर कार्गो तसेच वाढत्या नागरीकरणामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे इंजिन रायगड जिल्हा असणार आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात जे सरकार आहे, त्यांनाच जिल्हापरिषदेतही निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.