भाजपा सरकारविरोधात भारिपची निदर्शने

नवी मुंबई,18 मार्च 2017/ AV News Bureau

केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. या सरकारच्या काळात देशातच नव्हे तर राज्यातही नागरी समस्यांमध्ये वाढ झाली आहे. वाढती महागाई, बिघडलेली सामाजिक परिस्थिती हे या सरकारच्या कारभाराचे द्योतक आहे. शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण या सर्व पाशर्वभूमीवर भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने आज वाशीतील शिवाजी चौकात निर्दशने करण्यात आली.

या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष द. वि.चंदनशिवे उपस्थित होते . तसेच काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनीही आंदोलनात सहभागी होऊन भाजपा सरकारचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व भारीपचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अरुण गायकवाड , कामगार नेते , कार्याध्यक्ष प्रदीप वाघमारे, युवा अध्यक्ष सचिन जोगदंड यांनी केले. , जिल्हा उपाध्यक्ष भूषण कासारे, मनोज शर्मा, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, सरचिटणीस राम भद्रे, अनिल,.इंगोले, लक्ष्मण शिंदे, नरेंद्र जाधव, विजय गायकवाड ,शुभम प्रभे,भागीरं साळवे,भाऊराव भालेराव,युवराज कांबळे, जी.एस.वाटोरे, सुनील साबळे,जितेंद्र शिंदे,साहेबराव गायकवाड,प्रतिभा अंभोरे, शारदा अरकडे, अमोल कांबळे,प्रफुल शिरसाट , रोहित पवळे, आदि उपस्थित होते.