रिपब्लिकन ऐक्याच्या नावाने नवा गट काढणे थांबवा

रिपाइं नेते रामदास आठवले यांचे आवाहन

मुंबई, 3 एप्रिल 2017 /AV News Bureau:

रिपब्लिकन ऐक्यासाठी  सर्वांनी  आपले गट विसर्जित करून  एकत्र आले पाहिजे.  मात्र रिपब्लिकन ऐक्यासाठी काम कारणारे नंतर ऐक्याच्या नावाने नवा गट निर्माण करतात ते थांबवायला पाहिजे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले .

भायखळा  बीआयटी चाळ  सातरस्ता येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या भाई संगारे आणि पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या संयुक्त  अभिवादन सभेत  ते बोलत होते.

रिपब्लिकन ऐक्य  ही काळाची गरज आहे. ऐक्यासाठी आपण सदैव तयार आहोत. युती गटबंधन हे राजकारणात तात्पुरत्या असतात. ऐक्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत.आपण अनेकदा प्रकाश आंबेडकरांना रिपाइं ऐक्याचे नेतृत्व करण्याचे आवाहन केलेले आहे,असेही आठवले यांनी सांगितले.