कुलभूषण जाधव प्रकरणी अमेरिकेने हस्तक्षेप करावा

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

मुंबई,13एप्रिल 2017/AV News Bureau:

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानने पकडलेल्या कुलभूषण जाधव यांना वाचविण्यासाठी अमेरिकेने आणि  संयुक्त राष्ट्र संघाने ही  हस्तक्षेप करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय  सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी केली आहे .जाधव यांना वाचविण्यासाठी भारत सरकार पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

कुलभूषण जाधव  यांच्यावर हेरगिरीचा खोटा आरोप ठेवून पाकिस्तानने सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक आहे . याप्रकरणी मग्रुर पाकिस्तानचा तीव्र निषेध करीत आहोत. पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची गरज असल्याचे आठवले म्हणाले.

पाकिस्तान हे युद्धखोर राष्ट्र आहे.भारताच्या सीमेवर सतत कुरापती काढत आहे. कुलभूषण जाधव या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यास हेरगिरीच्या आरोपात फसवून भारताची छेड काढण्याचा  आगळीक पाकिस्तानने केल्याचेही आठवले म्हणाले.