ठाणे, 6 जून 2017/AV News Bureau:
केंद्र शासनाच्या अमृत योजनेतंर्गत घोडबंदर रोड परिसरासाठी ठाणे महानगरपालिकेच्या १८० कोटी रूपयांच्या मल:निसारण प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे. यामुळे घोडबंदर परिसरातील सन २०४९ सालापर्यंतच्या १० लाख लोकसंख्येला फायदा होणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अमृत योजनेतंर्गत घोडबंदर रोड परिसरासाठी १८४ कोटीचा प्रकल्प केंद्र शासनाकडे सादर केला होता. या प्रकल्पाला मंजूरी मिळाल्यामुळे ठाणे शहरातील मोठा प्रकल्प मार्गी लागला आहे. या योजनेतंर्गत २ मल प्रक्रिया केंद्रे, ५ मल उदंचन केंद्रे, ९२ किमीच्या मल वाहिन्या आदी कामांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी १८० कोटी खर्च अपेक्षित असून त्यातील ३३.३३ टक्के अनुदान केंद्र शासनाकडून मिळणार आहे, राज्य शासनाकडून १६.६७ टक्के अनुदान मिळणार आहे तर ठाणे महानगरपालिकेला यामध्ये ५० टक्के खर्च करावा लागणार आहे.













