मतदार जनजागृती महाअभियानाला उद्या मुंबईतून सुरुवात

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2019:

महाराष्ट्रात कमी मतदान होत असलेल्या 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. २ एप्रिल ते २८ एप्रिल या काळात विविध ठिकाणी रॅली आयोजित करण्यात येणार आहेत. 

  • रिजनल आऊटरिच ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश), माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयाशी समन्वय साधून हे अभियान आयोजित केले आहे.
  • मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात उद्या, 2 एप्रिल 2019 रोजी दुपारी 4 वाजता या अभियानाला सुरुवात होणार आहे. ‘कोणीही मतदार वंचित राहू नये’ अशी या अभियानाची संकल्पना आहे.
  • या प्रतिकात्मक प्रारंभानंतर दक्षिण मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि कल्याण येथे 2 ते 28 एप्रिल 2019 दरम्यान रॅली आयोजित केल्या जातील.
  • मतदार जागृतीसाठी 10 मोबाईल व्हॅन्स, 1200 हून अधिक ठिकाणांचा दौरा करतील. या अभियानादरम्यान गीत आणि नाटक प्रभागाचे कलाकार सादरीकरण करतील. मुंबईत 25 ते 28 एप्रिल 2019 हे चार दिवस ते कला सादर करतील.
या अभियानात पुढील विषयांवर माहिती दिली जाईल
  • PwD (दिव्यांग व्यक्ती) ॲप
  • cVigil ॲप
  • EVM आणि VVPAT चा वापर
  • मतदार ओळखपत्रासाठी 10 पर्याय, जे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी वापरता येतील.

=======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा