राज्यातील संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा – नाना पटोले

  • जनविरोधी भाजपा सरकार घालवून काँग्रेस पक्षाचे सरकार आणा – बाळासाहेब थोरात
  • झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा – अशोक चव्हाण 
  • लोकशाही व डॉ. बाबासाहेबांचे संविधान टिकवण्यासाठी हल्लाबोल मोर्चा. – विजय वडेट्टीवार

 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नागपूर/मुंबईदि. ११ डिसेंबर २०२३

 राज्यात शेतकरीशेतमजूरकामगारबेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत पण भाजपाचे आंधळेबहिरेमुके सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सरकारने मदत केली तर मग ती गेली कुठेराज्यात भिषण पाणीटंचाई आहेएकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे ओला दुष्काळ पडला आहे. अवकाळी पावसानेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी संकटात असल्याने सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजेअशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

बातमी वाचा : महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दिक्षाभूमी ते विधानभवन असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो लोकांनी सहभाग घेतला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणपृथ्वीराज चव्हाणतेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरेमाजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवारमाजी मंत्री सुनिल केदारडॉ. नितीन राऊतयशोमती ठाकूरवर्षा गायकवाडअमित देशमुखविधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटीलमाजी मंत्री सुरेश वरपुडकरमाजी मंत्री विश्वजित कदमप्रदेश कार्याध्यक्ष नसीम खानआमदार प्रणिती शिंदेबसवराज पाटीलचंद्रकांत हंडोरेआ. कुणाल पाटीलमुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगतापअल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झामहिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखेसेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडेयुवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतएनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेखएससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरेआमदार अभिजित वंजारीआ. सुभाष धोटेआ. अमित झनकनागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरेनागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळकप्रदेश सरचिटणीस देवानंद पवारप्रमोद मोरेमुख्य प्रवक्ते अतुल लोंढेसोशल मिडीया प्रमुख विशाल मुत्तेमवारमदन जाधव आदी उपस्थित होते.

नाना पटोले पुढे म्हणाले कीभाजपा सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्र आज गुन्हेगारीभ्रष्टाचारदंगली घडवण्यात देशात एक नंबरवर आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे देणेघेणे नाहीबेरोजगारांची थट्टा चालवली आहे. शिक्षण भरतीचा प्रश्न आहेजिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जात आहेत पण सरकार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तिसगड व मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमाभागात काँग्रेस पक्षाला मोठे जनसमर्थन मिळालेले आहे. या भागातून ७५ ते १०० टक्के काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेतमहाराष्ट्रातही काँग्रेसची लाट आहे हे लक्षात घ्या. भाजपा म्हणते तीन राज्यात जिंकलो मग हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावून दाखवा. जनता भाजपाच्या विरोधात आहे हे भाजपालाही माहित आहे म्हणून ते निवडणुकीला घाबरतात.

बातमी वाचा : हे शासन केवळ घोषणा करणारे नसून थेट काम करणारे शासन – पालकमंत्री शंभूराज देसाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तिसगडमध्ये धानाला ३१०० रुपये भाव व एक हजार बोनस देण्याची तसेच ४५० रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा करता मग महाराष्ट्रात का देत नाही याचे उत्तर भाजपा सरकारला द्यावे लागेल. हल्ला बोल मोर्चा हा सरकारला एक इशारा आहे हे लक्षात ठेवा. शेतकरीबेरोजगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे पटोले म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले कीमहागाई प्रचंड असून जनतेला जगणे कठीण झाले आहेशिक्षण झाले तरी तरुणांना नोकरी मिळत नाहीजनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. शेतकरीकामगारांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. हे सरकार आश्वासने भरपूर देते पण तूर्तता करत नाही. वीमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवून लुटत आहेत, पण सरकार त्यावर काहीच करत नाही. केंद्रातील भाजपा सरकार गेली ९.५ वर्ष लोकशाहीची पायमल्ली करत कारभार करत आहे. महाराष्ट्रातही तोडफोड करुन सरकार आणले आहे. आता या सरकारला घालवले पाहिजे. महाराष्ट्रातील भाजपा सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणायचे आहे. 

बातमी वाचा : गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले कीतेलंगणात काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या आणि जनतेने काँग्रेसला भरघोस मतदान करून सत्तेत आणलेकर्नाटकातही काँग्रेसने गॅरंटी दिल्या होत्या व तेथेही काँग्रेसचे सरकार आले आता महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार आणू. बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे पण सरकारने पाच वर्षात नोकर भरती केली नाही. MPSC च्या परिक्षा होत नाहीतगावात वीज नाहीपाणी नाहीशेती संकटात आहे. बरोजगारशेतकरीमहिलाशेतमजूरसफाई कामगारांचे प्रश्न आहेत. सरकारमधील मंत्री एकमेकाविरोधात बोलत आहेत. आजचा हा मोर्चा फक्त काँग्रेसचा नसून जनतेचा आक्रोश दाखवणारा आहे आणि या हल्लाबोल मोर्चामुळे झोपी गेलेले सरकार जागे होईल.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले कीराज्यातील शेतकरी दुष्काळगारपिटअवकाळी पावसाने देशोधडीला लागला आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी लावून धरत आहोत पण सरकार ऐकत नाही. आता शेतकरीच सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिंदे-पवार-फडणवीसांचे सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करत आहे. ‘जनतेला केला भिकारी आणि शासन आपल्या दारी’ अशी अवस्था आहे. अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार नोकर भरती करण्याचे आश्वासन दिले होते पण अजून नोकर भरती नाही. भ्रष्टाचाराकडे लक्ष जाऊ नयेमुळ प्रश्नाकडे लक्ष जाऊ नये म्हणून या सरकारने समाजा-समाजात भांडणे लावली आहेत. सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आम्ही लढतो. लोकशाही टिकवण्यासाठीडॉ. बाबासाहेबांचे संविधान टिकवण्यासाठी हा मोर्चा आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली. केंद्र सरकारने नोटबंदीजीएसटीलॉकडाऊन लावून अर्थव्यवस्था बिघडवली परिणामी लघुमध्यमछोटे उद्योग बंद पडले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था रसातळाला घालवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारचा पराभव केला नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपुष्टात आणले जाईल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन केंद्रातील भाजपा सरकारचा पराभव कराअसे आवाहन त्यांनी केले.

माजी मंत्री डॉ. नितीन राऊतयशोमती ठाकूरवर्षा गायकवाडप्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटीलमुख्य प्रवक्ते अतुल लोंढेयांनीही यावेळी मोर्चेकरांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी केले.

========================================================