१२ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे

(संग्रहीत छायाचित्र)

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 11 जून 2025

विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार 12 जून रोजी राज्यभर मशाल मोर्चे  काढणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीमधील आंदोलनात सहभागी होत आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील आंदोलनात पक्षाचे नेते सहभागी होणार असल्याचेही काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. 


लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठे यश मिळावे व भाजपा युतीचे पानीपत झाले होते. विधानसभा निवडणुकीत युती १०० जागाही जिंकू शकणार नाही अशी परिस्थिती असताना भाजपा युतीला प्रचंड बहुमताचा निकाल आला तो अनाकलनीय व अविश्वसनीय आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारवरही संशय निर्माण झालेला आहे. मतदान संपल्यानंतर ५८ टक्के जाहीर केलेले मतदार दुसऱ्या दिवशी मात्र ६६.५ टक्के दाखवून तब्बल ७.८३ टक्क्यांची वाढ दाखवली. हा एक मोठा घोटाळा आहे, असे काँग्रेसने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

हे वाचा : “आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाने निष्पक्ष व पारदर्शी निवडणूका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे पण त्यांच्यावरच संशयाचे ढग जमा होत असतील तर ते लोकशाही साठी घातक आहे. लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व निवडणूक आयोगावर निर्माण झालेले हे संशयाचे ढग दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील मॅच फिक्सिंगची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेतेआजी माजी खासदारआमदारपदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेतअशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

========================================================


========================================================