मुंबईत रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करा

नवाब मलिक यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई,18फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना या राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड वाक् युध्द सुरु आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात कुरघोडीचे प्रकार केले जात आहेत. परस्परांविरोधातील भांडणे व पोलिस तक्रारीत वाढ होत असून यामुळे सर्वसामान्य मुंबईकर जनतेमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर  संभाव्य हिंसक घटना टाळण्यासाठी मुंबई विभागात पॅरा मिलिट्री फोर्स व रॅपिड एक्शन फोर्स तातडीने तैनात करण्याची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य निवडणुक आयोगाकडे पत्राव्दारे केली आहे.