भाजपचे यश हे सत्ता संपत्तीच्या जोरावर 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

मुंबई,23फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे सत्ता, संपत्ती पणाला लावूनही म्हणावे तसे यश त्यांना मिळाले नसल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला मारला आहे.

राज्यातील 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदा तसेच 283 पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे गायब झाली असून ही गंभीर बाब आहे. याबाबत निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई होणे गरजेचे असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.