महाराष्ट्राकडून  50 टन तूरडाळ केरळला

  • पूरग्रस्त केरळला महाराष्ट्रातून मदतीचा ओघ

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 28 ऑगस्ट 2018:

केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने 50 टन तूरडाळ आज पाठविण्यात आली. नेत्रावती एक्सप्रेस मधून कुर्ला टर्मिनल्स येथून नेत्रावती एक्सप्रेसने ही डाळ पाठविण्यात आली.

 

क्रेडाई एमसीएचआय, जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, राजस्थानी वेलफेअर असोशिएशन आणि महाराष्ट्र स्टेट-को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. यावेळी मदत व पूनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, अप्पर मुख्य सचिव मदत व पुनर्वसन  मेधा गाडगीळ, संचालक नियंत्रण कक्ष दौलत देसाई नियंत्रक शिधावाटप दिलीप शिंदे, उपनियंत्रक शिधावाटप मधुकर बोडके, चंद्रकांत थोरात, माजी अपर मुख्य सचिव शेहजाद हुसैन तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने 20 कोटी, एसटी महामंडळाकडून 10 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच विविध संस्थेच्या माध्यमातून मदतीचे हात पुढे येत आहेत. अनेक संस्थांनी मदत केली गेली आहे. केरळमधील पुर ओसरला असून तेथील पुरग्रस्तांना डाळ, तांदूळ,तृणधान्य, सुकामेवा, बिस्किट अशा विविध टीकणाऱ्या वस्तू पाठवित आहोत. काल सांगली जिल्ह्यांतून पूरग्रस्तांसाठी बिस्किट पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

=================================================================================================================================

 

इतर बातम्यांचाही मागोवा

  • नेरुळ-खारकोपर रेल्वे  मार्ग ऑक्टोबरपासून -सिडको एमडी