उत्तर भारतीयांच्या मतांसाठी ठाकरे  बंधू उत्तर प्रदेशला गेले – जयंत पाटील

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, ३ डिसेंबर२०१८:

आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू उत्तरप्रदेशमध्ये जावून आले.म्हणजे दोघेही निवडणूका डोळयासमोर ठेवून राजकारण करत असल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ठाकरे बंधूंवर तोफ डागली.

मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत. कदाचित त्यासोबत विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. आता सगळेच पक्ष मतांकडे लक्ष ठेवून वागायला लागले आहेत, काम करायला लागले आहेत आणि बोलायला लागले आहेत. आत्ता उध्दव ठाकरे यांचं अयोध्येत शरयू नदीच्या काठावर जाणं होतं ते निवडणूका डोळयासमोर ठेवूनच होतं आणि राज ठाकरे यांचंही हिंदी भाषिकांसमोर जाणं आणि संवाद साधणं म्हणजे निवडणूकांचीच तयारी आहे असा आरोपही पाटील यांनी केला.

====================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • जुईनगर येथील रेल्वे फाटकातून जाणाऱ्या रस्त्याचा तिढा