9,10  एप्रिल रोजी द्रोणागिरी, खारघर, तळोजा, उलवेचा पाणी पुरवठा  बंद

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 5 एप्रिल 2019

 हेटवणे पाणी पुरवठा योजना येथे करावयाच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामांमुळे मंगळवार 9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपासून ते बुधवार, 10 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत द्रोणागिरी, खारघर, तळोजा, उलवे आणि आजूबाजूच्या गावांतील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल. मात्र तो कमी दाबाने होणार असल्याचे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन सिडकोने केले आहे.

ही दुरुस्ती व देखभालीची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे त्यास विलंब झाल्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.

====================================================

इतर बातम्यांचा मागोवा