गतीरोधकांवर दिवे बसविण्याची मागणी

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 28 मे 2019:

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात येणा-या रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी व्हावा या हेतूने गतीरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र रात्रीच्यावेळी हे गतीरोधक वाहन चालकांना दिसत नसल्यामुळे अनेकदा अपघात होत आहेत. हे अपघात होवू नयेत यासाठी सर्व गतीरोधकांवर दिवे बसविण्यात यावेत अशी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव विरेंद्र यशवंत म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रकरणी तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिल्याचे विरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा
  • सर्व्हिस रोडसाठी सायन -पनवेल हाय  वे रोखला