महाराष्ट्रात अखेर संचारबंदी लागू

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा राहणार सुरू 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

  • अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
  • मुंबई, २३ मार्च २०२०

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करूनही त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळेच अखेर राज्य सरकारने महाराष्ट्रात संचारबंदी लागू कऱण्याचा निर्णय़ घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.

एपीएमसी ३१ मार्चपर्यंत बंद
https://bit.ly/3aeccpV

कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच  या सूचना देतो.  आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला  नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल . एक लक्षात घ्या, कालचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे. सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होते. काल राज्यात १४४ कलम लावले होते. अनेकदा विनंती करूनही पालन होत नसल्याने मला राज्यात  संचार बंदी लावावी लागते आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

‘होम क्वारंटाईन’ चे काटेकोर पालन न करणा-या व्यक्तींवर होणार कायदेशीर कारवाई
https://bit.ly/33z3L62

खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादीत असेल. आपण इतर राज्याच्या सीमा बंद  केल्या होत्या. आजही आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली. देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
https://bit.ly/2U5Jnq1

जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील. नागरिकांना योग्य ती वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत. ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे.  घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत. या आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोनाविषयी जनजागृती करीत असल्याबद्दल सर्व माध्यमांना देखील मी धन्यवाद देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.