शिवभोजन पुढील 3 महिने पाच रुपयात मिळणार

योजना आता तालुका स्तरावर राबवण्याचा निर्णय
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, ७ एप्रिल २०२०

शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील ३ महिने ५ रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ही भोजनालये सकाळी ११ ते दुपारी ३ या काळात सुरु राहतील.

सध्या जिल्हा मुख्यालयी ही शिवभोजन केंद्रे चालविली जातात.  आता तालुका स्तरावर सुरु होतील. पुढील तीन महिन्यासाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर ५ रुपये इतका करण्यात आला आहे.

  • रेल्वेने केले २५०० डब्यांचे अलगीकरण कक्षात रुपांतर
    https://bit.ly/3dZ4Etj

शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात ५० रुपये प्रती थाळी असून ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या ५ रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी ३० रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येईल.

  • नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने बंद राहिल्यास कारवाई
    https://bit.ly/39irGYI

या शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा