साडेबारा टक्के योजनेतील प्रकल्पग्रस्त जमिनीचा मालक होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 12 जानेवारी 2026

नवी मुंबईचा एक मोठा वाटा असणाऱ्या भूमिपुत्रांचे देखील अनेक प्रश्न आहेत. विशेषता: गरजेपोटी घरांचे प्रश्न या ठिकाणी आहेत. साडेबारा टक्के वाल्या प्रत्येकाला मालक बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जमिन त्याचाच नावावर असेल या सगळ्या जमिनी फ्री होल्ड असतील सगळे अधिकार हे त्या ठिकाणी भूमिपुत्रांना असतील हे वचन देण्याकरता आणि संकल्प घेण्याकरता या ठिकाणी मी आलो असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोली येथे आयोजित केलेल्या जाहीर प्रचार सभेत केले.

नवी मुंबईत ऐरोली येथे भाजपच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

या जाहीर सभेला वन मंत्री गणेश नाईक, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे तसेच पदाधिकारी, भाजपाचे उमेदवार उपस्थित होते.

क्लिक करा :  बुद्धिमत्तेवर विश्वास हवा 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये नवी  मुंबईच्या विकासाला आम्हीदेखील हातभार लावला आणि येथील विकास कामांची गती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुंतवणूक असेल, पायाभूत सेवा असतील या सगळ्या गोष्टींमध्ये नवी मुंबई वेगाने पुढे चालली आहे.  नवी मुंबई विमानतळाला पुढच्या काळामध्ये आपण दि. बा. पाटील यांचे नाव देणार आहोत.

नवी मुंबई शहरात लोकलने प्रवास करणारा मोठा वर्ग आहे. या वर्गाला दिलासा देण्याकरिता आम्ही रेल्वे मंत्र्यांना  विनंती केली आणि मला सांगताना आनंद वाटतो, आता 50 टक्के भारत सरकार आणि 50 टक्के महाराष्ट्र सरकार अशा पद्धतीने खर्च करून लोकलचे सर्व डबे सगळे डबे वातानुकूलित करणार आहोत. स्वयंचलित दरवाजे असणार आहेत. हे सर्व करतानाही दुसऱ्या वर्गाच्या तिकिटामध्ये एक रुपया देखील वाढवला जाणार नाही हा निर्णय देखील आम्ही घेतला असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

क्लिक करा :  इतिहास आणि जलसंवर्धन

पाणी वापराबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, एमआयडीसीला पाणी वापराबाबत निर्बंध घालण्यात आले आहे. एमआयडीसीने धरणातून थेट पाणी वापरायचे नाही  तर महानगरपालिकेने स्वच्छ केलेले  सांडपाणी, पुर्नप्रक्रिया केलेलं पाणी उद्योगाला द्यायचं आणि जे पाणी वाचणार आहे ते महानगरपालिकांना वाढत्या लोकसंख्येकरता द्यायचे. त्यामुळे एक प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाण्याचा पुनर्वापर करणार आहोत.

भविष्यात नवी मुंबईचा विस्तार मुंबईपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात होणार आहे. या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा असा जलस्त्रोत उपलब्ध होण्यासाठी पोशीर आणि शिलारची योजना तयार केली आहे. अनेक वर्ष या योजनेवर केवळ चर्चा होत होती. यासाठी महानगरपालिका की सिडको यांनी पैसा खर्च करायचा यावर निर्णय होत नसल्याने सगळे प्रकल्प बंद होते सहा आठ महिन्यापूर्वी या दोन्ही प्रकल्पाच्या फाईल बोलावून त्या फाईलवर लिहिलं हे प्रकल्प करायची जबाबदारी एमएमआरडीए यांची असेल. पाटबंधारे विभाग तयार करतील आणि हे तयार करताना जे कर्ज काढावे लागेल. त्याला राज्य सरकार हमी देईल आणि त्यासोबत पुढच्या काळामध्ये कर्ज परत करत असताना जेवढ्या महानगरपालिकांना पाणी देऊन त्यांच्याकडून थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन आपण घेऊ असं करून त्याला मी मान्यता दिली.  नवी मुंबई महानगरपालिकेला 2050 पर्यंत जेवढे पाणी लागेल ते सगळं पाढे पोशीरच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आता या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा कोणताही त्याठिकाणी तुटवडा असणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवी मुंबईच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही. नवी मुंबईच्या हक्काचे पैसे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत आणि भविष्यात मिळणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्या योजना पूर्ण होतील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

========================================================