कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोल माफी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंंबई, 9 सप्टेंबर 2026

गणेशोत्सव आता काही दिवसांवरच येवून ठेपला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ सुरु झाली आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आगामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांचा पथकर (TOLL TAX) माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

क्लिक करा: मानसिकतेविरूध्द कायद्याची साथ महत्त्वाची

11 सप्टेंबर ते 27  सप्टेंबर या कालावधीत मुंबई- बंगलोर राष्ट्रीय महामार्ग (मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसह) आणि मुंबई –गोवा महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सर्व मार्गावरील टोल या कालावधीत माफ करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईहून कोकणात तसेच पश्चिम महाराष्टाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाशिवडी- न्हावा शेवा (अटल सेतू) मार्गावरही टोलमाफी देण्यात आली आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी आपल्या वाहनांचे पास स्थानिक पोलीस ठाणे,  स्थानिक वाहतूक पोलीस चौकी तसेच आरटीओ कार्यालयातून प्राप्त करावे, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.

क्लिक करा : बुद्धिमत्तेवर विश्वास हवा