मार्केट परिसरात स्वच्छता मोहिम

नवी मुंबई, 16 जानेवारी 2017 /AV News Bureau :

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कृषी मंडया, धान्य व भाजीपाला मार्केट आदी ठिकाणी महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

14 जानेवारी रोजी ऐरोली सेक्टर-5 येथील भाजीमार्केट मध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, मार्केटमध्येच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे याबाबत स्थानिकांना मार्गदर्शन करण्यात आले.  त्याचप्रमाणे वाशी सेक्टर-9 येथील भाजीमार्केट व परिसरात मध्ये नागरीकांच्या सहभागातून विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.