निवडणुकीत रिपाइंची मते निर्णायक ठरतील

रामदास आठवले  यांचा दावा

 मुंबई, 14 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

 मुंबई महापालिकेच्या  निवडणुकीत सर्वच पक्षांना आपले अधिक उमेदवार निवडून  आणायचे आहेत. मात्र या लढाईत रिपब्लिकन पक्षाची मते निर्णायक ठरणार असून भाजप रिपाइं महायुतीच विजयी होईल असा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.  वॉर्ड क्र 93  च्या रिपाइं-भाजप महायुतीच्या  उमेदवार  राणी सुमित वजाळे  यांच्या  प्रचार सभेत ते बोलत होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांच्या कल्याणासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. मुद्रा योजना, सुगम्य भारत, स्टार्ट अप इंडिया अश्या अनेक चांगल्या योजना त्यांनी सुरु केल्याचे सांगत  ‘काम करीत  नाही खोटा  तर कशाला येतील काळ्या नोटा ’ असे सांगत मोदी यांनी काळ्या पैशावर केलेला नोटा बंदीचा सर्जिकल स्ट्राइक चांगलाच होता. रिपाइंने त्या  निर्णयाचे  स्वागत केले असल्याचे आठवले म्हणाले.