उद्या ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद

ठाणे, 25 मे 2017/AV News Bureau:

ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतून तसेच स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, 26 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवार, 27 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

  • या भागातील पाणी पुरवठा बंद

समतानगर, ऋतुपार्क, सिध्देवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा,  शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग , घोडबंदर रोड, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादि परिसराचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे.

  • पाण्याचा जपून वापर करा

या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.