कर्जमाफीसाठी 13 लाख 93,449 शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई,20 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया  २४ जुलैपासून सुरू झाली आहे. 19 ऑगस्टपर्यंत 16 लाख 68 हजार 723 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 13 लाख 93 हजार 449 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये एकूण 26 हजार केद्रांवर अर्ज भरण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून होईपर्यत ही केंद्र सुरू राहणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.