निकालानंतर मुख्यमंत्री मातोश्रीवर

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, २३ मे २०१९:

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांसह थेट मातोश्रीवर गेले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागांवर युतीने आपला झेंडा फडकावला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा