20,21 जानेवारी रोजी खारघर, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटी, न्हावा आणि आजूबाजूच्या गावांमधील पाणी पुरवठा बंद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 18 जानेवारी २०२०

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या आम्र मार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या हेटवणे जलवाहिनीचे स्थलांतर करावयाचे असल्याने 20 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 21 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत खारघर, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटी, ओएनजीसी, न्हावा आणि आजूबाजूच्या गावांमधील पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच त्यानंतर पाणी पुरवठा सुरू झाल्यावर तो कमी दाबाने होईल.

संबंधित नोड्समधील आणि आजूबाजूच्या गावांतील रहिवाशांनी याची कृपया नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे. त्याचप्रमाणे रहिवाशांनी पाणी साठवण्याची योग्य ती व्यवस्था करावी असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.

===================================================

इतर बातम्यांचाही मागोवा