राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक
मुंबई, 24 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:
राज्यात झालेल्या निवडणूकांच्या निकालाचे अवलोकन करुन पुढील काळात चांगल्या पध्दतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्य करील.तसेच पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,राष्ट्रीय काँग्रेस व समविचारी पक्ष यांच्या सहकार्याने एकत्रितपणे काम करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
राज्यामध्ये झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पक्षाला पाठिंबा देणाऱ्या बहुसंख्य ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. शहर व ग्रामीण अशा दोन्ही स्तरावर पक्षाने अधिक परिणामकारक कार्य करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.












