तर भाजपाला बसपाने पाठिंबा द्यावा

रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मायावतीना आवाहन

मुंबई, 5 मार्च 2017/AV News Bureau:

उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर बसपाच्या मातावतींनी  भाजपला  सरकार  स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.  वाराणसी येथून जवळ असलेल्या शिवपूर विधानसभा मतदार संघात रिपाइं उमेदवारांच्या प्रचारसभेत आठवले बोलत होते.

उत्तर प्रदेशात भाजपचा तीन वेळा पाठिंबा घेऊन मायावती यांनी बसपचे सरकार स्थापन केले होते. भाजपच्या पाठिंब्यावर तीनवेळा मुख्यमंत्री पद मिळविणाऱ्या मायावती यांनी  उत्तर प्रदेश च्या जनतेच्या हितासाठी  एकदा तरी भाजप ला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले.

भाजपला रिपाइंचा पाठिंबा आहे. त्यामुळे येथे भाजप ला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.