९ जानेवारीपासून राष्ट्रवादीची ‘परिवर्तन यात्रा’

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, १९ डिसेंबर २०१८:

‘निर्धार परिवर्तनाचा’ ही भूमिका घेवून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आणि महाडच्या चवदार तळयाच्या परिसरात पहिली सभा घेवून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ९ जानेवारीपासून परिवर्तन यात्रा सुरु करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

  • केंद्र आणि राज्यसरकारचे अपयश लोकांसमोर मांडून लोकांच्यामध्ये जावून महाराष्ट्रात सर्व समाज संघटीत करुन भाजप-सेनेच्याविरोधात ही परिवर्तनाची यात्रा काढणार आहोत असेही पाटील यांनी सांगितले.
  • सर्वव्यापी असे या परिवर्तन यात्रेचे स्वरुप असणार आहे.परिवर्तनाची भूमिका घेवून आता परिवर्तन अटळ आहे हे महाराष्ट्रातील सर्व समाजाला आणि सर्व घटकाला नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजपच्या सरकारने जो भ्रमनिरास केला आहे. ज्यांना फसवलं आहे त्या सर्वांच्यासमोर जावून ही भूमिका मांडणार असल्याचा आमचा महत्वाचा भाग आहे असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी म्हटले आहे.

=======================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उलवे टेकडीचे सपाटीकरण