रत्नागिरी येथे रस्ते अपघातात मुंबईचे 7 ठार

रत्नागिरी, 8 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी भरधाव झायलो कार झाडावर आदळून झालेल्या भिषण अपघातात गाडीतील सात जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.  मुंबई –गोवा महामार्गावरील खानू गावाजवळ सकाळी 8 च्या सुमारास हा भिषण अपघात घडला.. हे प्रवासी मुंबईचे असल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार,  गाडी क्रमांक MH 06-AS 6291 ही झायलो गाडी मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जात होती. सकाळी 8 च्या सुमारास रत्नागिरीजवळील  पालीखानू गावाजवळ गाडी एका झाडावर जोरात आदळली. गाडीची टक्कर एवढी जोरात बसली की, गाडीत बसलेल्या वैभव तोडकर, वैभव मनवे, निहाल कोटियन, प्रशांत गुरव, मयूर बेलणेकर, अभय केरकर आणि सचिन सावंत यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर अभिषेक कांबळी हा गंभीर जखमी झाला. जखमी अभिषेक कांबळीला रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी नियंत्रण कक्षाच्या पोलीस उपनिरिक्षक एस.के. गावखडकर यांनी दिली.

याप्रकरणी ग्रामीण  रत्नागिरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस निरिक्षक ए.के. विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असल्याचे गावखडकर यांनी सांगितले.