मुंबईच्या विकासासाठी भाजपा हाच सक्षम पर्याय

danave

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन

मुंबई, 16फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

मुंबई शहर सुरक्षित व विकसित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सक्षम पर्याय दिला असून महापालिका निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमताने विजयी करा, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरूवारी केले.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वरळीमध्ये जिजामातानगर येथे भाजपाच्या प्रचारसभेत मा. प्रदेशाध्यक्ष बोलत होते.

मुंबई शहरात प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी, चांगले रस्ते व वाहतूक सुविधा मिळण्यासाठी भाजपाने आपल्या वचननाम्यात आश्वासने दिली आहेत. महापालिकेत सत्तेवर आल्यावर भाजपा सर्व आश्वासने पूर्ण करील असे दानवे यांनी सांगितले.

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण संपूर्ण राज्याचा दौरा केला. सर्वत्र भाजपाला पाठिंबा दिसून आला. त्यामुळे सर्व दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपाच यशस्वी होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.