नक्षलवाद्यांचे दलित, आदिवासी प्रेम बेगड़ी

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

पश्चिम बंगाल(मालदा),26एप्रिल 2017:

दलित आदिवासींसाठी लढण्याचा दावा करणाऱ्या नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात मारलेले सीआरपीएफ चे 25 जवान हे सुद्धा दलित आदिवासींमधूनच केंद्रीय राखीव पोलीस दलात भर्ती झाले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांचे दलित आदिवासी प्रेम बेगड़ी आहे. नक्षलवाद्यांना खरोखर दलित आदिवासींचा विकास करायचा असेल तर त्यांनी हिंसक मार्ग सोडून देशाच्या मुख्यप्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पश्चिम बंगाल च्या मालदा जिल्ह्यातील नूरपुर येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपाइंचे पश्चिम बंगाल प्रदेश अध्यक्ष मृत्युंजय मलिक मुरसद शेख मौलाना काशिरुल मंडल, विनोद निकाळजे आदी उपस्थित होते .

आगामी पश्चिम बंगाल विधासनसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सत्तेला धक्का देऊ आणि भाजपच्या नेतृत्वात एन डी ए ची सत्ता प्रस्थापित करू असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.