भारत बनवणार स्वतःचे अवकाश स्थानक

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 13 जून 2019 :

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील तेव्हा 2022 मध्ये भारत पहिले मानवी अंतराळ यान पाठवेल. या अभियानासाठी केंद्र सरकारने 10 हजार कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी चांद्रयान-2 मोहिमेसह गगनयान आणि अन्य मोहिमांची माहिती दिली. 2023 मध्ये शुक्र ग्रहावर एक मोहिम राबवण्यासाठी  इस्रो प्रयत्नशील असल्याचे सिवन म्हणाले. 

चांद्रयान-2 मोहिमेसह इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय ईशान्य राज्य विकास, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. सिंग यांनी सामान्य माणसाचे जीवनमान सुधारण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या वापराचा लाभ अधोरेखित केला. चंद्रावर पाणी आहे हे सिद्ध करण्यास चांद्रयान-1  महत्त्वाचे होते, असे मत व्यक्त केले.

——————————————————————————————————