9 सप्टेंबर पासून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021

देशभरातील 698 जिल्ह्यांमधील 17,475 गावांचा समावेश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2021 :

स्वच्छ भारत अभियान टप्पा -2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, 2021 ला 9 सप्टेंबर पासून सुरूवात करण्यात येणार आहे. देशभरातील 698 जिल्ह्यांमधील 17,475 गावांचा समावेश केला जाणार आहे. ‘स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून, देशभरातील हागणदारी मुक्त उपक्रम आणि परिणामांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणने  समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून, गावे, जिल्हे आणि राज्ये यांना प्रमुख नियमांच्या आधारे क्रमवारीत स्थान दिले जाईल.

सर्वेक्षण कसे होणार

17,475 गावांमधील शाळा, अंगणवाड्या, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, हाट/बाजार/धार्मिक स्थळे या 87,250 सार्वजनिक स्थळांना सर्वेक्षणासाठी भेट देण्यात येईल. सुमारे 1,74,750 कुटुंबांची स्वच्छ भारत अभियान संबंधित समस्यांवरील प्रतिसादासाठी मुलाखत घेतली जाईल. तसेच, यासाठी विकसित ऍप्लिकेशनचा वापर करून स्वच्छताविषयक समस्यांवर ऑनलाईन अभिप्राय देण्यासाठी नागरिकांना एकत्र आणले जाईल.

मूल्यांकन कसे होणार

  • सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे थेट निरीक्षण -30%
  • सामान्य नागरिक, ग्रामीण स्तरावरील प्रमुख प्रभावी व्यक्ती आणि मोबाईल अॅप  द्वारे  नागरिकांकडून ऑनलाइन अभिप्रायासह नागरिकांच्या प्रतिक्रिया -35%
  • स्वच्छता संबंधित मापदंडांवर सेवा स्तरावरील प्रगती -35%

——————————————————————————————————