ठाण्याचा शुक्रवारी (13 ऑक्टोबर) पाणीपुरवठा बंद

ठाणे,12 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

महाराष्‍ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा योजनेच्‍या 1590 मी.मी. व्‍यासाच्‍या जलवाहिनीच्या अत्‍यावश्‍्यक दुरुस्‍तीचे काम करण्‍यात येणार आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी (13 ऑक्‍टोबर) रोजी 34 तास ​शिळ टाकी येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा प्रभाग समितीमधील गणपतीपाडा, विटावा व कळव्‍याचा काही भाग इत्यादी परिसराचा महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत  पिसे येथील पपिंग स्टेशनच्या सब स्टेशनमध्ये 8 ऑक्टोंबर रोजी वीज पडल्याने काम ठप्प पडले. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी तसेच पाणी वितरण जलवाहिन्यांवरील एअर व्हॉल्व, गळतीची दुरुस्ती करण्यासाठी उद्या सकाळी 10ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.  त्यामुळे घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाऊण्ड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, ऋतूपार्क, उथळसर इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा याकाळात बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.