उद्या ठाण्याचा पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे,20 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

स्‍टेम प्रा​धिकरणाकडून होणाऱ्या तसेच ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेच्‍या मुख्य जलवाहिनीच्‍या व इतर तांत्रिक दुरूस्तीसाठी दुरुस्‍तीसाठी उद्या, 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते गुरुवार सकाळी 9 या काळात ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या भागात 24 तास पाणी पुरवठा बंद

या कालावधीत घोडबंदर रोड, पवार नगर, आझादनगर,  डोंगरीपाडा, मुंब्रा काही भाग व समतानगर, रुपादेवी पाडा, ऋतुपार्क, सिध्देश्‍्वर, जल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, वागळे इस्‍टेट, लोकमान्यनगर, श्रीनगर, मुंब्रा कोळीवाडा,  शैलेशनगर, संजयनगर व कळवा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे.

  • या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.